
संता, बंता आणि जंता तिन सरदारजी एका बेटावर अडकतात. ते तिघेही मनापासून देवाची प्रार्थना करतात आणि देव त्यांच्यासमोर प्रगट होतो. देव त्यांना वर मागायला सांगतो.देव जेव्हा संताला वर मागायला सांगतो तेव्हा संता म्हणतो, ''देवा मला बुद्धीमान बनव'''' तथास्तू'' देव म्हणतो.संता पोहत पोहत जावून बेटावरुन नदीच्या काठावर पोहोचतो. आता दुसरा सरदार बंता वर मागतो, '' देवा मला संतापेक्षा बुध्दीमान बनव'' '' तथास्तू'' देव म्हणतो.बंता एक बोट बनवून बेटावरुन बोटीत बसून नदीच्या काठावर जातो. आता तिसरा सरदार जंता वर मागतो, '' देवा मला संता आणि बंतापेक्षाही बुध्दीमान बनव'''' तथास्तू'' देव म्हणतो.जंता पुलावरुन चालत नदीच्या काठावर पोहोचतो.
